मुंबई

कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी 

रविंद्र खरात

कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण पुढील कसारा, कर्जत राहणाऱ्या नागरीकांना पर्यायी दळणवळणाच्या सुविधा नसल्याने त्यांना रेल्वेवर अवलंबून राहावे लागत आहे. या मार्गावर लोकल सेवा ही तोकडी पडत असल्याने अनेकांना लोकल पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून अनेकांना जीव ही गमवावा लागत आहे. हा ताण कमी करण्यासाठी नवीन बांधकामांना स्थगिती आणा, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानक परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. पर्यायी स्वस्त वाहतूक सेवा नसल्याने प्रतिदिन 15 लाख प्रवासी कल्याण, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने ये-जा करतात. दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांना कमी खर्चात व कमी वेळेत या भागात पोहचविण्याकरिता लोकल सेवे व्यतिरिक्त पर्यायी दळणवळण व्यवस्था नाही. सद्यस्थितीला जी लोकल सेवा उपलब्ध आहे ती मर्यादित आहे. याचे कारण दोन्ही मार्गांवर दुहेरी मार्गिका आहे. त्यामुळे लोकलसेवा चालविताना अपुऱ्या पायाभुत सुविधांच्या अभावी गेली 15 वर्ष काही बदल नाही. कल्याण कसारा तिसरी असेल वा कल्याण बदलापुर तिसरी चौथी मार्गिका यांचे काम गेली 8 वर्ष उलटूनही अद्यापही संथगतीने सुरू आहे.

त्यामुळे नजिकच्या येत्या 4 वर्षातही ही पुर्णत्वाला येण्याबाबत सध्याचे यातील काम पाहता साशंकता वाटतेय त्यामुळे रेल्वे प्रशासन लोकल सेवा वाढविण्याबाबत उदासिन आहे.

त्यामुळे या भागात वाढत्या लोकवस्तीतील लोंढ्यातून लोकल सेवेवर ताण येतोय व जनावरे कोंबावी त्याप्रमाणे सध्या या लोकलने प्रवास केला जातोय यातून अपघात घडतायेत आणि मृत्युचा हा सरासरी दैनंदिन आकडा 8 ते 10 आहे. 

कल्याण ते कर्जत आणि कसारा मार्गावर दळणवळणाबाबतच्या जोपर्यंत पायाभुत सुविधा वाढत नाहीत, तोपर्यंत या भागात कोणत्याही नवीन गृहसंकुलांना परवानगी देऊ नये अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावर लोकसंख्या वाढल्याने लोकवस्ती वाढली आहे. एकीकडे घरांच्या माध्यमातून महसूल राज्य सरकारला मिळतो, तर दळणवळणचा पर्याय नसल्याने रेल्वेने प्रवास करतात त्यातून रेल्वेला महसूल मिळतो. मात्र सुविधा शून्य न रेल्वे लोकल सेवा वाढवीत न राज्य सरकार पर्यायी सेवा देत नाही. यात मात्र सर्व सामान्यांचा जीव जातो. यामुळे नवीन गृहसंकुलाच्या बांधकामाला स्थगिती देण्याची मागणी केली असून ही मागणी मान्य न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT